आज मन थोडं उदास आहे. कोणाची आठवण येते की मग कोणाला भेटावसं वाटत माहीत नाही पण स्वतःच मन स्वतःलाच खायला उठल आहे. समजत नाही जीवन कुठे घेऊन जात आहे. प्रत्येक वळणावर एकटेपणा आहे...
कधी वाटत कोणीतरी येईल व हळूचकणी जवळ करून कुशीत घेईल पण हे सर्व मृगजळाप्रमाणे एका क्षणात नाहीस होणार....
कधी-कधी वाटत गर्दी असावी आजू-बाजूला पण कधी नुसतच ऐकटेपणा वाटतो, कधी तर असे वाटते की कुठेतरी दूर जाऊन शांत ठिकाणी जाऊन तासंतास ऐकट बसावं. असेच विचार मनात घोळ घालत असताना सहज काहीतरी सुचलं व Page वर तेच कविता,लेख व जीवनाचे Quotes याच्या आधारे Post करत आहे. नक्की वाचा.... कुणास ठाऊक एखाद्या प्रश्नाचं उत्तर कुणाला इथे मिळेल, कुणास ठाऊक कुणाच्या आयुष्याचं गणित इथे सुटेल...
लेखक : अनुराधा कोकणी
0 Comments
》अगर आप के कुछ भी सवाल हैं, वह आप नीचे दिए हुए Comment सेक्शन में पूछ सकते हैं। 《